नवी दिल्ली वृत्तसंस्था – बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या भावावर प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईवरून मायावती भाजपवर चांगल्याच भडकल्या. भाजपने स्वत: कडे पाहावे. भाजप नेते स्वत: ला इमानदार समजत असतील परंतु त्यांचीदेखील चौकशी व्हायला पाहिजे. त्यांची संपत्ती कोठून आली. त्यांच्याकडे राजकारणात येण्यापुर्वी काय होते. आणि आता त्यांच्याकडे काय आहे. तेव्हा देशात सर्वकाही स्पष्ट होईल. असं त्या म्हणाल्या.
प्राप्तिकर विभागाने बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे भाऊ आणि पक्षाचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीवर मोठी कारवाई करत त्यांचा ४०० कोटी रुपयांचा प्लॉट जप्त केला. नोएडामध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मायावती यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
BSP Chief Mayawati: BJP should look at themselves, if they think they are very honest then they should investigate how much wealth they & their family had before coming into politics & how much it is now. So everything becomes clear before the country. pic.twitter.com/dAN6VWjoXH
— ANI UP (@ANINewsUP) July 19, 2019
मायावती यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवरच निशाणा साधत भाजपचे जे नेते स्वत:ला इमानदार समजतात. त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. कारण राजकारणात येण्याआधी त्यांच्याकडे किती संपत्ती होती. आणि आता किती संपत्ती आहे? वंचित पुढे गेले की त्यांना त्रास होतो. असेही त्या म्हणाल्या.
तर स्वत: ला हरिश्चंद्र मानणाऱ्या भाजपने हे सांगावे की, निवडणूकीत त्यांच्याकडे २ हजार कोटी रुपये आले कोठून? ही बेनामी संपत्ती नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.