पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडीत झाल्याने वाहनांच्या लाईट सुरु ठेवून अत्यंविधी करण्याची वेळ वाकड स्मशानभुमीत गुरुवारी (दि. 18) आली.
पिंपरी-चिंचवड शहरची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल आहे. विकास कामांसाठी वाकड स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खोदला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच स्मशानभूमी परिसरातील गुरुवारी रात्री विद्युत दिवे बंद होते. यामुळे स्मशानभूमीत काळोख पसरला होता. शेवटी अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना वाहनाच्या लाईट सुरु ठेवून अंत्यविधी करावा लागला.
स्थानिक नागरिक राम वाकडकर म्हणाले, “स्मार्ट सिटीतील आणि वाकड सारख्या प्रगतशील परिसरात अशी परिस्थिती असणे ही शहरासाठी मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या सहनशीलतेचा आणखी अंत नपाहता स्मशानभूमी परिसरातील विजेचा आणि रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा.