मुंबई बहुजननामा ऑनलाइन – राज्यात भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संसार थाटला. युतीत बिनसल्यानंतर महाविकासआघाडी उभारत राज्यात पर्यायी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. परंतू यानंतर शिवसेनेचे बडे नेते मनोहर जोशी यांनी मोठे खळबळजनक वक्तव्य केले.
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं, हेच चांगलं आहे असे मला वाटतं. सध्याच्या परिस्थिती दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचं दिसतं आहे असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी म्हणाले. शिवसेना भाजप कधीही एकत्र येतील. उद्धव ठाकरे हे योग्य वेळी निर्णय घेतील असे खळबळजनक वक्तव्य मनोहर जोशी यांनी केले.
Former Chief Minister of Maharashtra & Shiv Sena leader, Manohar Joshi: In my opinion, it will be better if BJP & Shiv Sena stay together. But both the parties don't want it at present. pic.twitter.com/fNtNRLIQF0
— ANI (@ANI) December 10, 2019
काय म्हणाले मनोहर जोशी –
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं असं माझं मत आहे, परंतू सध्यास्थितीत हे दोन्ही पक्षांना मान्य असावं असं वाटत नाही. राज्यात युतीत भाजप शिवसेनेने विधानसभा निवडणूक लढली. परंतू निकाल लागल्यावर महायुतीत धूसफूस सुरु झाली. मुख्यमंत्रि पदावरुन वाद झाला आणि युतीत बिनसलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केलं, परंतू 80 तासात हे सरकार कोळसलं. त्यानंतर महाविकासआघाडीचे राज्यात सरकार स्थापन झाले. महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळाला. परंतू सरकार स्थापन झाल्यानंतर फक्त 13 दिवसांनी शिवसेना भाजप कधीही एकत्र येईल असे खळबळजनक वक्तव्य मनोहर जोशी यांनी केले.
Visit : bahujannama.com