मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील बदलेल्या भूमिकेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे. सोमवारी (दि.9) शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केले. मग आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात कशामुळे आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव आणल्यानेच शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.
सोमवारी शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधेयकाबद्दल स्पष्टता आवश्यक असल्याचे म्हटले. सरकारनं विधेयकाबाबतची भूमिका स्पष्ट केली नाही तर राज्यसभेत विधेयकाला विरोध करु असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावरून फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केले, मात्र आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात आहे. काँग्रेसचा दबाव आल्यानं सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं भूमिका बदलली का, असा सवाल उपस्थित केला. शिवसेना आपली जुनी भूमिका बलणार नाही, अशी आपेक्षादेखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच शपथविधीला दोन आठवडे झाले असून अद्याप खाते वाटप झाले नाही. अशा परिस्थितीत उत्तर कोण देणार असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.
Visit : bahujannama.com