जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात हातून सत्ता गेल्यानंतर भाजपने आता त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांवर पक्षाने जबाबदारी दिल्याची माहिती मिळत असून पक्षाला भक्कम करण्यासाठी नवीन योजना आखत आहे. विधानसभेत भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते तर पंकजा मुंडेंना पराभव मिळाल्याचा धक्का सहन करावा लागला होता.
यानंतर या नेत्यांनी पक्षाच्या राज्य पातळीवर असलेल्या नेतृत्वाला लक्ष्य केल्यानंतर भाजपने त्यांच्या नाराजीची दखल घेतली. लवकरच खडसे, पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांना विधानपरिषदेत संधी देणार असल्याची माहिती मिळत आहे. तेव्हा या नेत्यांना परत मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाजप करत असल्याचे चित्र दिसत असताना भाजप विधान परिषदेत पुन्हा आक्रमक होऊ शकतो.
तसेच खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे हे पुढील सहा महिन्यात विधान परिषदेत आमदार होतील, अशी शक्यता आहे. भाजपमधील नाराज असलेले नेते आपला वेगळा गट तयार करतील, अशी चर्चा असल्याने कदाचित भाजपने आता मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
Visit : bahujannama.com