पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केला आहे. ‘साखरे संदर्भात एका कार्यक्रमात हे म्हणतात की, साखरेचा विषय निघाला की मी जयंत पाटीलांकडे बघतो. महसुलाचा विषय आला की बाळासाहेब थोरातांकडे बघतो. मग तुम्ही काय करता ? फक्त वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का ? आणि राज्याला असा मुख्यमंत्री चालणार का ?’ अशा शब्दात पाटील यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राज्यातील अवकाळी पावसाने ९४ लाख हेक्टरचे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई दिली, असा सवालही पाटील यांनी केला आहे. अवकाळी पावसानंतर ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तो धागा पकडत बांधा काय असतो हेही तुम्हाला कळत नाही. एकर, हेक्टर काय हे कळत नाही. हेक्टर म्हणजे काय ते सांगा पहिले. एका हेक्टरमध्ये किती एकर ? एका एकरात किती गुंठे आणि एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा येते, याची माहिती सांगा. तसेच एमएसपी, एफआरपी म्हणजे काय हे पण कळत नाही, अशा खडतर शब्दात पाटील यांनी टीका केली.
शिवसेना प्रमुख यांनी कधीही पॅड घेतले नाही. पण त्यांनी ठरवले असते तर ते राष्ट्रपतीही झाले असते. पण त्यात शान होती. आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदावरून टीका करत पाहिल्यादांच आमदार झालेल्यांना थोडे प्रशिक्षण घेऊ द्या, असा सल्ला पाटील यांनी दिला. तसेच दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासारख्या नेत्यांना घरचा रास्ता दाखवला असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
Visit : bahujannama.com