भुसावळ : बहुजननामा ऑनलाईन – भीमा कोरेगाव हिंसाचार आणि पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधित तपासावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घातल्याने केंद्राने घाईघाईत हा तपास एनआयएकडे दिला. यावरून आता राजकारण तापले आहे. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्राची भूमिक योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा निर्णय योग्य असल्याचे सांगताना शरद पवार यांची भूमिका खोडून काढली आहे.
यासंदर्भात खडसे म्हणाले, शरद पवार साहेबांनी परवा वक्तव्य केले होते की भीमा कोरेगावची दंगल ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने झाली आहे. जर पवार साहेबांनी म्हटले असेल तर स्थानिक पोलीसच स्थानिक पोलिसांची चौकशी कसे करू शकतात ? त्यामुळे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देणे योग्य आहे. आक्षेप जर पोलिसांवर आहे तर वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी, असे खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रान एनआयएकडे तपास दिल्यानंतर शरद पवार यांनी भाजपावर जोरदार आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत पवार यांनी म्हटले की, सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकड दिला आहे. कायदा व सुवव्यवस्था हे राज्य सरकारचे काम आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिस अधिकार्यांनी तारतम्य ठेवले नाही. एल्गार परिषदेत चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. अन्यायाबद्दल बोलणे म्हणजे नक्षलवाद नव्हे. आम्ही एसआयटीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने कुरघोडी केली आहे. सत्य बाहेर येईल या भितीने एनआयएकडे तपास दिला आहे, असे पवार म्हणाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे देण्याच्या केंद्राच्या कृतीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, आघाडीचे सरकारचे यासंबंधीचे आरोप म्हणजे निव्वळ कल्पनाविलास आहे.
Visit : bahujannama.com