वाराणसी : वृत्तसंस्था – वाराणसीमध्ये एका तरूणीला मोबाईलवर बोलताना केलेला निष्काळजीपणा एवढा महागात पडला की आपला जीव गमवावा लागला. यामुळे तिचे कुटुंब हादरले आहे. राजातालाब परिसरातील आराजी लाईन विकासखंडच्या इईटही मरूई गावातील 21 वर्षीय रूबीचा छतावरून पडल्याने मृत्यू झाला.
घरातल्यांनी सांगितले की, दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर रूबी कोणाचा तरी फोन आल्याने गेली होती. ती तेथे मोाबईल फोनवर बोलत बोलत फेर्या मारत होती. बोलता बोलता ती छताच्या किनार्याजवळ आली आणि टेरेसच्या भिंतीची उंची कमी असल्याने ती खाली पडली. रूबीला उपचारासाठी चटणी येथील रूग्णालयात नेण्यात आले.डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तिच्या मृत्यूचे वृत्त समजताच घरातील सर्वजण हादरले. वडील मेवालाल आणि आई शांतीसह कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. बहिण सविता, भाऊ दिवाकर यांनी सांगितले की, फोनवर बोलताना ती छतावरून खाली पडली. रूबी पदवी परीक्षा पास झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
Visit : bahujannama.com