बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी निघाले असून ते त्यांचा राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं ती फेटाळली आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात सांगितले होते. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयानं सीबीआयला 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव वाढला.
याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा व्टि्ट करुन माहिती दिली आहे. या व्टि्ट मध्ये त्यांनी राजीनाम्याचे लेटर टाकले असून यामध्ये “गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.” अशाप्रकारचे ट्वि्ट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021