हैदराबाद : वृत्तसंस्था – १४ सप्टेंबर २०१८ मध्ये मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची हत्या तिच्या डोळ्यांसमोर केल्याची घटना घडली होती. ही घटना तेलंगणामधील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजपुल्ली येथील आहे. आता मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना आम्हाला वडिलांच्या मृत्यूबद्दल कोणीही माहिती दिली नव्हती. आम्हाला टीव्हीवरील बातम्यांमधून समजले आहे. असे मुलीने सांगितले आहे.
दोघांचे एकमेकांवर प्रेम असताना त्यांच्या लग्नाला विरोध होता. शेवटी घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते. पण त्यांचा संसार जास्त काळ चालला नाही. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याने त्याचा राग आल्याने मुलींसमोर तिच्या पतीची हत्या केली गेली. यानंतर त्या अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून ती आता तिच्या सासरी राहते. पण दोनच दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली असून ती आत्महत्या नसल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अमृताने आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल बोलताना फारसे दुःख व्यक्त केले नसून टीव्हीवरूनच मृत्यूबद्दल समजल्याने तिने सांगितले. प्रणयच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबाशी काहीही बोलणे झाले नसल्याचेही तिने सांगितले. तसेच वडिलांना प्रणयच्या हत्येचा पश्चाताप झाला असेल, म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी, असे तिने म्हटले आहे.
या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. खैरताबाद येथील आर्यवैश्य भवनमध्ये मारुतीराव यांनी विष पिऊन आत्महत्या केली. आपल्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील टी. मारुती राव यांनी ख्रिश्चन दलित समाजातील पेरुमला प्रणय याची हत्या करण्यासाठी एक कोटींची सुपारी दिली होती. मारेकऱ्याने भर रस्त्यात अमृतासमोरच प्रणयवर वार केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावरुन जगभर व्हायरल झाला.