वाशिम : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकावणाऱ्या भाजपाने समाजाची फसवणूक केली, असा आरोप करत तालुक्यातील हजारो महिलांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा अहेर करण्यात आला.समाजाला न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपा सरकार धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर केवळ आश्वासन देवून बोळवण करीत आहे. धनगर समाजाने मोर्चे, महाअधिवेशन घेवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू , याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने समाजाची फसवणूक करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या वतीने शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा आहेर देण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या महिलांनी दिली.
भाजपाच्या नेत्यांनी धनगर समाजाची आरक्षणाची मागणी निकाली काढण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकाविली. मात्र, मागील साडेचार वर्षांपासून केवळ आश्वासन देवून समाजाची बोळवण करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ धनगर समाजाला आश्वासनाच्या भुलथापा देत आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या धनगर समाजाने संपूर्ण तालुक्यात अहिल्याबाई महिला ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा गावनिहाय बैठका घेतल्या. या बैठकीत महिलांनी विद्यमान फडणवीसांचे शासन हे नपुंसक असून हे फक्त स्वहित जोपासणारे असल्यावर शिक्कामोर्तब केले.
धनगर समाजाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनासाठी शेलुबाजार, वनोजा, गोग्री, कंझरा, पार्डी, पेडगावसह तालुक्यातील गावागावातून महिलांनी एकत्रित आलेल्या हजारो महिलांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी साडी, चोळी, हळदी, कुंकू, बांगड्यांचा अहेर तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या मार्फत सरकारला पाठविण्यात आला. यावेळी शासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या गेल्यास आंंदोलन अधिक तिव्र करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी सांगीतले.
वाशिम : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकावणाऱ्या भाजपाने समाजाची फसवणूक केली, असा आरोप करत तालुक्यातील हजारो महिलांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा अहेर करण्यात आला.समाजाला न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपा सरकार धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर केवळ आश्वासन देवून बोळवण करीत आहे. धनगर समाजाने मोर्चे, महाअधिवेशन घेवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू , याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने समाजाची फसवणूक करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या वतीने शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा आहेर देण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या महिलांनी दिली.
भाजपाच्या नेत्यांनी धनगर समाजाची आरक्षणाची मागणी निकाली काढण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकाविली. मात्र, मागील साडेचार वर्षांपासून केवळ आश्वासन देवून समाजाची बोळवण करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ धनगर समाजाला आश्वासनाच्या भुलथापा देत आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या धनगर समाजाने संपूर्ण तालुक्यात अहिल्याबाई महिला ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा गावनिहाय बैठका घेतल्या. या बैठकीत महिलांनी विद्यमान फडणवीसांचे शासन हे नपुंसक असून हे फक्त स्वहित जोपासणारे असल्यावर शिक्कामोर्तब केले.
धनगर समाजाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनासाठी शेलुबाजार, वनोजा, गोग्री, कंझरा, पार्डी, पेडगावसह तालुक्यातील गावागावातून महिलांनी एकत्रित आलेल्या हजारो महिलांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी साडी, चोळी, हळदी, कुंकू, बांगड्यांचा अहेर तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या मार्फत सरकारला पाठविण्यात आला. यावेळी शासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या गेल्यास आंंदोलन अधिक तिव्र करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी सांगीतले.
वाशिम : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकावणाऱ्या भाजपाने समाजाची फसवणूक केली, असा आरोप करत तालुक्यातील हजारो महिलांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा अहेर करण्यात आला.समाजाला न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपा सरकार धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर केवळ आश्वासन देवून बोळवण करीत आहे. धनगर समाजाने मोर्चे, महाअधिवेशन घेवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू , याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने समाजाची फसवणूक करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या वतीने शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा आहेर देण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या महिलांनी दिली.
भाजपाच्या नेत्यांनी धनगर समाजाची आरक्षणाची मागणी निकाली काढण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकाविली. मात्र, मागील साडेचार वर्षांपासून केवळ आश्वासन देवून समाजाची बोळवण करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ धनगर समाजाला आश्वासनाच्या भुलथापा देत आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या धनगर समाजाने संपूर्ण तालुक्यात अहिल्याबाई महिला ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा गावनिहाय बैठका घेतल्या. या बैठकीत महिलांनी विद्यमान फडणवीसांचे शासन हे नपुंसक असून हे फक्त स्वहित जोपासणारे असल्यावर शिक्कामोर्तब केले.
धनगर समाजाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनासाठी शेलुबाजार, वनोजा, गोग्री, कंझरा, पार्डी, पेडगावसह तालुक्यातील गावागावातून महिलांनी एकत्रित आलेल्या हजारो महिलांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी साडी, चोळी, हळदी, कुंकू, बांगड्यांचा अहेर तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या मार्फत सरकारला पाठविण्यात आला. यावेळी शासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या गेल्यास आंंदोलन अधिक तिव्र करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी सांगीतले.
वाशिम : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकावणाऱ्या भाजपाने समाजाची फसवणूक केली, असा आरोप करत तालुक्यातील हजारो महिलांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा अहेर करण्यात आला.समाजाला न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपा सरकार धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर केवळ आश्वासन देवून बोळवण करीत आहे. धनगर समाजाने मोर्चे, महाअधिवेशन घेवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू , याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने समाजाची फसवणूक करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या वतीने शासनकर्त्यांना साडी, चोळी व हिरव्या बांगड्यांचा आहेर देण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अहिल्यादेवी महिला ब्रिगेडच्या महिलांनी दिली.
भाजपाच्या नेत्यांनी धनगर समाजाची आरक्षणाची मागणी निकाली काढण्याचे आश्वासन देवून सत्ता बळकाविली. मात्र, मागील साडेचार वर्षांपासून केवळ आश्वासन देवून समाजाची बोळवण करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ धनगर समाजाला आश्वासनाच्या भुलथापा देत आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या धनगर समाजाने संपूर्ण तालुक्यात अहिल्याबाई महिला ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा गावनिहाय बैठका घेतल्या. या बैठकीत महिलांनी विद्यमान फडणवीसांचे शासन हे नपुंसक असून हे फक्त स्वहित जोपासणारे असल्यावर शिक्कामोर्तब केले.
धनगर समाजाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनासाठी शेलुबाजार, वनोजा, गोग्री, कंझरा, पार्डी, पेडगावसह तालुक्यातील गावागावातून महिलांनी एकत्रित आलेल्या हजारो महिलांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी साडी, चोळी, हळदी, कुंकू, बांगड्यांचा अहेर तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या मार्फत सरकारला पाठविण्यात आला. यावेळी शासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या गेल्यास आंंदोलन अधिक तिव्र करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी सांगीतले.