निलंगा : मिलिंद कांबळे – करपेवाडी येथील नाभीक समाजातील भाग्यश्री संतोष माने या भगीणीस नराधमांनी गळा चीरून ठार मारले आहे. सदर घटना घडून 10 दिवस उलटूही गेले तरी अद्याप सातारा पोलिसांनी आरोपिस अटक केली नाहीत.
सदर घटना ही मानुसकीला काळीमा फासणारी असून मुलीची हत्या ही अत्यंत क्रुरपने करण्यात आली आहे. परंतु सातारा पोलिस या घटनेकडे दुर्लक्ष करित असल्याचे दिसत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ निलंगा येथील विविध पक्ष संघटनां व जागृत नागरिकांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन देऊन निवेदनात तीव्र निषेध नोंदवीण्यात आला आहे.
निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन
छेडन्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर विर जिवाजी महाले विचार मंच निलंगा,सावता परिषद सघटनीचे शरद पेठकर ,बारा बलुतेदार संघटना,कुभार समाज संघटना,नाभीक मंडळ संघटना सुतार समाज संघटना ,नाभीक महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ मिरखले ,जिवाजी महाले ता,अध्यक्ष अमोल चौधरी ,बारा बलुतेदार मंचक पांचाळ ,पत्रकार गुरूनाथ मोहळकर, व्यवसाय असोशीयन शहर अरूण सुर्यवंशी ,संजय नंनदकर, बबण नाईकवाडे, सतीष सुर्यवशी , दिगंबर सोमवशी, दयानंद झरे, उद्धव शेटे तुकाराम, सुर्यवंशी, विष्णु माने,संतोष सुर्यवंशी तुकाराम सुर्यवंशी,माधव सुर्यवंशी, यांच्यासह अनेक बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत