सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिंदे गटाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे शिवसेना (शिंदे गट- Shiv Sena (Shinde Group)) प्रवक्ते विजय शिवतारे (Spokesperson Vijay Shivtare) यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, खोके म्हटल्यावर शिंदे गटाला एवढं का झोंबतं? असा खोचक सवाल ठाकरे यांनी केला. खोके म्हणजे नक्की काय ? त्यांना हे का झोंबतंय ? हेही त्यांनी स्पष्ट करावं. खोके म्हणजे खोके असतात. त्याचा इतर काही अर्थ असेल, तर त्यांनी सांगावं हे आम्हाला. सोलापुरातील काही भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Group) प्रवेश केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला, त्यांच्या गद्दारीची नोंद घेणाऱ्या 33 देशांनाही
याची नोटीस पाठवली पाहिजे. कारण खोके सरकार जगभर प्रसिद्ध झालं आहे.
नोटीस द्यायची आधी त्यांनी एकच सांगावं, की त्यांना हे का झोंबलं आहे. मग त्यांनी उत्तर द्यावं.
त्यांना सगळं बोलू द्या. पण या गद्दार सरकारमध्ये प्रत्येकजण फक्त राजकारणावर लक्ष देत आहे.
राज्यातून उद्योग निघून गेले, याकडे कुणाचंही लक्ष नाही.
महाराष्ट्र एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी मागे चालला आहे. गद्दार त्यांचं घाणेरडं राजकारण करत आहेत.
त्यांना त्यांचं राजकारण करु द्या, आम्ही जनतेची सेवा करत राहू, असं ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Aditya Thackeray | aaditya thackeray shivsena slams eknath shinde group abdul sattar
हे देखील वाचा :
Pune Crime | बढाई समाज ट्रस्टच्या अध्यक्षाच्या खूनाचा प्रयत्न; रविवार पेठेतील घटना
Priyanka Chopra | लखनऊमध्ये पोस्टर लावून अभिनेत्री प्रियांका चोप्राचा केला निषेध, काय आहे नेमके प्रकरण?