यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – महामानव प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी आंदोलनासाठी निष्ठावान राहणाऱ्या जुन्या आणि तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान सोहळा वैद्यकीय महाविद्यालय चौकातील बचत भवन येथे पार पडला. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा आंबेडकरी कार्यकर्ता सन्मान समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते १३५ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक व राजकीय आंदोलनाने आज या देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त झाला आहे. विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य ज्या चळवळीमुळे मिळाले, त्या आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या सोबत व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेल्या नामांतर आंदोलन असो, घाटकोपर प्रकरण, खैरलांजी असो किंवा रिडल्सचे आंदोलन असो की असो आर्थिक प्रश्नावर लढल्या गेलेल्या भूमिहीनांचे आंदोलन, या सर्व आंदोलनात ज्यांनी स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष न देता समाजासाठी खस्ता खाल्ल्या, अशा निष्ठावान आंबेडकरी कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान व्हावा व वर्तमानातील कार्यकतृर्त्वाचा वसा पुढील पिढ्यांपयंर्त पोहोचावा, यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटिका प्राचार्या कमल गवई होत्या. अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे ‘कॅप्टन’ अशोक खंताडे होते. सन्मान सोहळ्याला ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते ‘पॅन्थर’ डॉ. पुरणचंद्र मेश्राम, आंबेडकरी बंडखोर कवी ई. मो.नारनवरे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते चंदन तेलंग, सत्यशोधक समाजाचे डॉ. दिलीप घावडे, बाळासाहेब सोनोने, पी. डी. डबले, बापुराव धुळे, मोहन भोयर, महेंद्र मानकर, प्रकाश भस्मे आदी मान्यवर उपस्थित होते. मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते यवतमाळतून प्रामुख्याने गोविंद मेश्राम, जयप्रकाश चव्हाण, सुनील बोरकर, विनोद खोब्रागडे, ॲड. अमोल गणवीर, विजय पाटील, कमला गायकवाड, कल्पना मेश्राम, सरस्वती जोगळेकर, लोपामुद्रा महाजन, ईश्वर फुल्लूके, प्रकाश पाटील, कल्पना बागडे, अमर गायकवाड, मंदा गडपायले यांच्यासह एकूण ३२ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. बाभूळगाव तालुक्यातून ज्येष्ठ रिपाई नेते पी. डी. डबले, उत्तम दिघाडे, शंकर वानखेडे, रत्नपाल डोफे, धर्मपाल माने यांच्यासह एकूण १० कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
दारव्हा तालुक्यातून विमल मुजमुले, सदाशिव परोपटे, देवबा खंडारे, अनुसया गडपायले, रामकृष्ण अघम, अशोक वाकोडे यांच्यासह ९ लोकांचा सन्मान करण्यात आला. नेर तालुक्यातून महादेव घरडे, सुधाकर तायडे, जयकृष्ण बोरकर यांच्यासह इतर ८ लोकांचा सत्कार करण्यात आला. वणी तालुक्यातून रंजना मोडक, गौतम तेलंग, पुंडलिक साठे, अशोक भगत, जयंत साठे, संजय तेलंग यांच्यासह पांढरकवडा तालुक्यातून बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी तुकाराम जनपदकर यांचा सन्मान त्यांच्या कन्या कांबळे यांनी स्वीकारला. उमरखेड तालुक्यातून दादाराव पाईकराव, सोनबा हनवते, प्रेम हनवते, डॉ. अनिल काळपांडे, सज्जन बरडे, बापुराव धुळे यांच्यासह इतर १२ लोकांचा तर महागाव आर्णी तालुक्यातून पांडुरंग बरडे, पुरुषोत्तम चोखोबा खंडारे, शरद जाधव, संजय भगत, आर.एम. भालेराव, भीमराव वाघमारे (कळंब) आदी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास भवरे यांनी केले. भूमिका आनंद गायकवाड यांनी मांडल्या. संचालन सुनील वासनिक यांनी केले. ठरावाचे वाचन आयोजन समितीचे संजय बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नवनीत महाजन, कवडू नगराळे, आनंद धवने, डॉ. सुभाष जमधाडे, सुमेद ठमके, डॉ. साहेबराव कदम, भीमसिंह चव्हाण, ॲड.धनंजय मानकर, ॲड. रवींद्र अलोणे, महेंद्र गजभिये, सोमेश्वर जाधव, सुरेश कांबळे, रत्नपाल डोफे, प्रा. डॉ. विश्वजित कांबळे, बंडू गंगावणे, बापुराव रंगारी, राहुल सोनवणे, प्रकाश भस्मे, अविनाश भगत, आनंद डोंगरे, कल्पना चव्हाण, मालती गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.