यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – तीन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिका अर्जुन खर्गे यांना महाराष्ट्र व कर्नाटक येथील बंजारा समाजाचे शिष्टमंडळ भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी बंजारा समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले.
मल्लिका अर्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र प्रभारीपदाचा राजीनामा द्यावा , बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा, काँग्रेस पक्षातील पुढाऱ्यांना तांडाबंदी करणार असल्याचा इशारा दिला आहे. तहसीलदार गजानन हामंद यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अरविंद जाधव, तालुकाध्यक्ष कैलाश राठोड, शहराध्यक्ष संजय आडे, नरसिंग राठोड, बंडू जाधव, ॲड. मनोज राठोड, बाबूसिंग राठोड, मिलिंद राठोड, विकास चव्हाण, विशाल जाधव, बंडू राठोड, संदीप चव्हाण, लखन राठोड सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.