मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातील गावांमधून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील गावांमध्ये आदिवासी समाज पुनर्वसित झाला होता. दरम्यान त्यांनी विविध मागण्यांसाठी लढा दिला होता. मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाने महाराष्ट्र असंघटीत कामगार काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली आकोट तालुक्यात पुनर्वसीत झालेल्या गावांमध्ये शेतजमिनीसह मुलभूत सुविधा पुर्णत: मिळाल्या नाहीत. विशेष म्हणजे त्यांना कुठलेही रोजगाराचे साधन नाही. आरोग्य, शैक्षणिक, पिण्याचे पाणी, बेरोजगारी आदींसह विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मागण्यांसाठी लाँगमार्चचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे गुरुवार ६ डिसेंबर रोजी अकोट येथून अकोल्याच्या दिशेने या लॉंगमार्चचे प्रस्थान केले आहे. आणि आज ७ डिसेंबर शुक्रवार आदीवासींचा हा लाँगमार्च अकोला शहरात दाखल झाला आहे. दरम्यान ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणारआहेत.
विशेष म्हणजे हातात न्याय मागणीचे फलक घेऊन मोर्चात महीला, पुरुष, तसेच लहान मुला मुलींसोबत, तरुणपिढीही सहभागी झाली आहे. इतकेच न्हे तर या लॉंगमार्चमध्ये आमदार आशिष देशमुख, प्रमोद चोरे, असंघटीत कामगार काँग्रेसचे अध्यक्ष मो.बद्रुज्जमा, असंघटीत कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नारे, तालुकाध्यक्ष गजानन रेळे, शहर अध्यक्ष महादेवराव सातपुते, अ.भा.आदिवासी परिषद चे कार्याध्यक्ष डिगांबर सोळंके,आनंद अग्रवाल, सेवादलाचे विजय शर्मा सहभागी झाले आहेत.
इतकेच नव्हे तर या लॉंगमार्चला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेता बाळासाहेब विखे पाटील, निरीक्षक सहप्रभारी आशिष दुवा, माणिकराव ठाकरे, अरविंद सिंग, इरफान आलम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर, आरिफ नसिम खान, आसिफ देशमुख, चारुलता टोकस, केवलराम काळे, नामदेव उसंडी, वजाहत मिर्झा यांची उपस्थिती राहणार आहेत.