बीड: पाेलीसनामा ऑनलाईन-महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे एस टी अनुसूचित जमातीच्या सवलतीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्रातील सरकार कुचकामी ठरले तर 2019ला महाराष्ट्रातील धनगर समाजा सोबत ग़द्दारी केली तरभारतीय जनता पार्टीला सरकार सत्तेतून खाली खेचू असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावान बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की महाराष्ट्रातील धनगर समाजाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत पुष्ट क्र.36 धनगर समाजाचा एस टी अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे. परंतू महाराष्ट्रातील राज्यकर्ते धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून फक्त निवडणूका आल्या की महाराष्ट्रातील गरिब व मेंढपाळ असलेल्या धनगर समाजाची आठवण येते पुढे ते ही फक्त मते घेण्यापुर्ती परंतू लोकसंख्यने महाराष्ट्रात एक कोटी चाळीस लाख असलेल्या धनगर समाजाची गेल्या 65 वर्षापासून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस सरकारने फसवणूक केली होती.
म्हणून धनगर समाजाने सन 2014 च्या निवडणूकी दरम्यान पंढरपुर ते बारामती अशी मोठी पदयात्रा निघाली होती आणि त्या पदयात्रे दरम्यान बारामती येथे धनगर समाजाचे मावळे उपोषणाला बसले होते त्यावेळी तेव्हाचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आताचे महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री देवेद्र फडणविस यांनी त्यावेळी धनगर समाजाच्या उपोषण स्थळी जाऊन आश्वासन दिले होते की आम्हचे सरकार सत्तेत आल्यास धनगर समाजाच्या एस टी अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करू परंतू तब्बल चार वर्ष संपत अाले परंतू भारतीय जनता पार्टी सरकारने धनगर समाजाचा एस टी अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी केली नाही.
सरकारने पुढील आगामी एका वर्षात धनगर समाजाचा आक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस सरकारची जी गत केली ती भारतीय जनता पार्टी सरकारची केल्या शिवाय महाराष्ट्रातील धनगर समाज गप्प बसणार नाही असे देखिल वाकसे यांनी म्हटले आहे