छात्र भारती आणि राष्ट्र सेवा दलाने पुणे ते मुंबई शिक्षण – रोजगाराच्या हक्कासाठी लाँगमार्च काढला होता. यावेळी हजारो तरुण मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाँगमार्चच्या शिष्टमंडळाची विधान भवनात भेट घडवून आणली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाबरोबर केलेल्या चर्चेत महापरीक्षा पोर्टल बंद करुन सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात या मागणीविषयी चौकशी करुन कार्यवाही करण्याचे मान्य केले.
याचबरोबर शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने जाहीर करावा या मागणीवर सकारात्मक कृतीचे आश्वासन दिले आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क रद्द करुन त्यांना स्पर्धा परीक्षांसह सर्व परीक्षांसाठी येण्याचा जाण्याचा प्रवास खर्च शासनाने द्यावा, या मागणीवरही विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपुर्ती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी. स्थगित शिष्यवृत्या पूर्ववत सुरु कराव्यात. या मागणीवरही विचार करु असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
१५ नोव्हेंबरला पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून लाँगमार्चची सुरवात झाली होती. या लाँगमार्चला हजारो तरुणांचाच सहभाग होता. पाचव्या दिवशी लाँगमार्च मुंबईत दाखल झाला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. मुख्यमंत्र्यां सोबत झालेल्या शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे, राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत, संदीप आखाडे, राकेश पवार, लोकेश लाटे, कीर्ती इटकर, सचिन बनसोडे आदी उपस्थित होते.
छात्र भारती आणि राष्ट्र सेवा दलाने पुणे ते मुंबई शिक्षण – रोजगाराच्या हक्कासाठी लाँगमार्च काढला होता. यावेळी हजारो तरुण मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाँगमार्चच्या शिष्टमंडळाची विधान भवनात भेट घडवून आणली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाबरोबर केलेल्या चर्चेत महापरीक्षा पोर्टल बंद करुन सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात या मागणीविषयी चौकशी करुन कार्यवाही करण्याचे मान्य केले.
याचबरोबर शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने जाहीर करावा या मागणीवर सकारात्मक कृतीचे आश्वासन दिले आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क रद्द करुन त्यांना स्पर्धा परीक्षांसह सर्व परीक्षांसाठी येण्याचा जाण्याचा प्रवास खर्च शासनाने द्यावा, या मागणीवरही विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपुर्ती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी. स्थगित शिष्यवृत्या पूर्ववत सुरु कराव्यात. या मागणीवरही विचार करु असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
१५ नोव्हेंबरला पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून लाँगमार्चची सुरवात झाली होती. या लाँगमार्चला हजारो तरुणांचाच सहभाग होता. पाचव्या दिवशी लाँगमार्च मुंबईत दाखल झाला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. मुख्यमंत्र्यां सोबत झालेल्या शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे, राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत, संदीप आखाडे, राकेश पवार, लोकेश लाटे, कीर्ती इटकर, सचिन बनसोडे आदी उपस्थित होते.