बीड : बहुजननामा ऑनलाइन – अन्याय, अत्याचाराविरुध्द लढण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना बाळकडू दिले. त्यामुळे स्वराज्याची निर्मिती होऊ शकली. जिजाऊंसारखा कणखर बाणा असलेल्या विचारांची समाजाचा गरज असल्याचे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या कमल निंबाळकर यांनी केले.
येथील नवजीवन शिक्षक कॉलनीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कमल निंबाळकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पूनम आंधळे, सविता हंगे, कल्पना दराडे, अरुणा सोळंके, सुलक्षणा माने, सिंधू कुर्लेकर यांचा जिजाऊ चरित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक ॲड. मीरा बडगे यांनी केले. सूत्रसंचालन करुन आभार मधुमती मुसळे यांनी मानले.
यावेळी सुवर्णा गुजर, कविता केळगंद्रे, वर्षा बोंदार्डे, प्रियंका चोले, डॉ. अश्विनी चोले, संगीता निंबाळकर, आशा ताटे, सुरेखा आंधळे, स्मिता नवले, मनीषा नवले, उषा नवले, सारिका जाधव, अर्चना जाधव, सुनीता इंगोले, किरण गिराम आदींची उपस्थिती होती.