चाळीसगाव : बहुजननामा ऑनलाइन – माणसाने जगत असताना इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करावा. पतीने पत्नीवर दाखवलेला अधिकार पत्नीने अतिशय प्रेमळपणे परतून लावावा. यासाठी अनेक युक्त्या सांगत जात माणसाच्या जन्माने नाही तर जगण्याने सिद्ध झाली पाहिजे, असे सांगत परदेशात आपल्या संस्कृतीचे मोठे चाहते आहेत. तुम्ही भारतीय असल्याचे सांगावे लागत नाही. कारण आपली देहबोली त्याला संस्कृती सभ्यतेला अनुसरून आहे. सर्व व्यवहारात तणाव आहे; मात्र तो प्रेमाने दूर सारा. कारण आपली जात ही जन्माने नाही तर जगण्याने सिद्ध होते, असे स्पष्ट प्रतिपादन अभिनेत्री तथा विचारवंत डॉ.निशिगंधा वाड यांनी केले. त्या आ. उन्मेष पाटील व उमंग परिवाराच्यावतीने आयोजित उमंग व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना बोलत होत्या.
यावेळी आ.उन्मेश पाटील यांनी प्रास्ताविकातून चाळीसगाव तालुक्यातील सांस्कृतिक शैक्षणिक इतिहास पाहुण्यांसमोर मांडला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अशालाता चव्हाण, पं. स. च्या सभापती स्मितल बोरसे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे,नाट्यप्रेमी डॉ. मुकुंद करबळकर, डॉ. पुष्कर घाटे, डॉ. समिधा घाटे, विजय गर्गे, तुषार मुजुमदार, गौरव काळंगे, रवि निकम, अश्विन खैरनार, रमेश पोतदार, सुषमा पाटील, प्रा. साधना निकम, प्रा. छाया निकम, प्रा. पी. आर. पाटील, प्रा. बोरसे, कथ्थक नृत्यांगना कविता बागुल, प्रियंका देवरे, नाट्य कलावंत साहेबराव काळे, संगीत शिक्षक श्रीनिवास मोडक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ नाट्य समीक्षक विकास शुक्ल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. निशिगंधा वाड यांनी जीवन जगण्याच्या अनेक टिप्स श्रोत्यांना दिल्या. महिलांनी आपल्या भावनांना आवर घालून तणावात जीवन न जगता कशा पद्धतीने समयसूचकता ठेवावी, यासाठी त्यांनी अनेक जगण्याच्या युक्त्या देत प्रेम पाकातल्या पाच पुऱ्या ही किस्से शाही उलगडली. सूत्रसंचालन सोनल वाघ यांनी केले. आभार अमोल चव्हाण यांनी मानले.यावेळी तहसीलदार कैलास देवरे, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक संजय पाटील, नितीन पाटील, मानसिंग राजपूत, चिराग शेख,नरेन जैन, प्रा. सुनील निकम, जितेंद्र वाघ, नगरसेविका विजया पवार, विजया पवार, विश्वास चव्हाण, समकित छाजेड, अमित दायमा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.