परभणी : बहुजननामा ऑनलाइन – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे सर्व जाती-धर्माचे लोक सुखाने नांदत असून राज्यघटनेमुळेच देश अखंड राहिला, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. येथील कामगार कल्याण भवनातील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित संविधान सन्मान सोहळ्याप्रसंगी आनंदराज आंबेडकर बोलत होते.
यावेळी राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, बाजार समिती सभापती रवींद्र डासाळकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके, गौतम धापसे, मिलिंद सावंत, डॉ.संजय हरबडे, गौतम कनकुटे, ॲड.दत्ता कदम, संजीव बोधनकर, आशिष वाकोडे, माधव जमधडे, सूर्यकांत रायभोळे, मोहन समिंद्रे, गौतम साळवे, नितीन बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, संविधानामुळे सर्वांना समान अधिकार दिले आहे. त्यामुळे उच्च-निच असा भेद होत नाही. राज्यघटनेमुळे सर्वांना समान अधिकार घालून दिला असल्याने कोणाला काय करायचे ते स्वतंत्र घटनेमुळे आहे. राज्यघटनेमुळे जीवनमान उंचावले असून सध्या मात्र काही समाजकंटक घटनेच्या विरोधात काम करीत आहेत. त्यांची मजाल घटना जाळण्यापर्यंत जात असून सरकार मात्र अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकत नाही, हे देशाच्या राज्यकर्त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, बालकिशन साळवे यांनीही आपले मनोगत मांडले. प्रास्ताविक सुबोध काकडे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी केले तर आभार भारत काकडे यांनी मानले.
संविधान सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. विष्णू ढोले, भगीरथ धापसे, विलास कांबळे, अमित धापसे, सुरेश राक्षे, जयनोद्दीन शेख, धम्मपाल काकडे, तथागत भदर्गे, गिरजाराम अंभोरे, दिनकर गायकवाड, अमर मगर, बुवाजी निकाळजे, देविदास मगर, गुल्या धापसे, राणोजी ढाले, भीमराव गोटे, सत्यपाल कांगले, आनंद साळवे, विकी घायतिडक, प्रकाश हातागळे, राहुल जाधव, अजय धापसे, दिनेश वाघमारे, विजय खेबाळे, बुध्दभूषण ढगे, अक्षय साळवे आदींनी पुढाकार घेतला.