नवी दिल्ली : वृत्तसंस्था –लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी राजीनामा दिला आहे.
भाजप सत्तेसाठई वाट्टेल ते करत आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्त्वाचा भाजपला विसर पडला आहे, अशी टीका अपांग यांनी पक्षश्रेष्ठींवर केली आहे. तसंच याबाबत त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे. या पत्राद्वारे अपांग यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
पत्रात त्यांनी जोरदार टीका केली आहे. पक्ष फक्त सत्ता मिळवण्याचे व्यासपीठ बनलं आहे. भाजप पक्ष अशा नेत्याच्या हातात आहे, जो विकेंद्रीकरण आणि लोकशाही पद्धतीने निर्णय प्रक्रियेता विरोध करतोय. त्याने मुल्यांना कधीही मानलं नाही, असं यापत्रात लिहिलं आहे.
टीकेसोबत अपांग यांनी आपली बाजूही स्पष्ट केली आहे. वाजपेयींनी नेहमी एकतेवर विश्वास ठेवला. वाजपेयींनी राजधर्म शिवकवला. ते एक महान नेते होते. मी आजही त्यांनी शिकवलेल्या राजधर्मांचेच पालन करतोय, असं त्यांनी म्हटलं.दरम्यान, अपांग यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अपांग हे सात वेळा आमदार होते. त्यानंतर २३ वर्ष अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या फक्त दोन जागा आहेत. मात्र पुर्ण ईशान्य भारताचा विचार करता हा मोठा धक्का असल्याचं बोलले जात आहे.
https://twitter.com/gegongapang/status/1085173603749019649