पुणे : बहुजननामा ऑनलाइन – दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोरेगाव-भीमा येथील रहिवाश्यांनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांचे गुलाब पुष्प आणि पिण्याचे पाणी देऊन स्वागत करण्यात आले. यावरून जे झालं ते झालं, गेल्या वर्षीच्या कटू आठवणी बाजूला सारत स्थानिकांकडून एकीचा सूर पाहायला मिळाला.
पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. दरम्यान १ जानेवारी २०१८ ला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हिंसाचार झाला होता. इतकेच नव्हे तर त्या दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते.
इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी असा हिंसाचार होऊ नये म्हणून, सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचबरोबर छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली जात आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी झालेल्या दंगलीमुळे यंदा दोन-अडीच महिने आधीपासूनच प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थांनी एकमेकांना विश्वासात घेऊन तयारी सुरू केली होती. विशेषतः पेरणेमधील गावकऱ्यांनी आणि परिसरातील गावांनी विशेष तयारी केलेली पाहायला मिळाली. याचबरोबर स्थानिकांनी गुलाबपुष्प आणि पाणी देऊन आभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर कोणत्याही भीसैनिकाच्या मनात कोणतीही भीती नाही आणि शंकाही नाही. आमचे स्वागत आनंदाने स्वीकारले जात होते’.
दरम्यान वाईट विचार करून जे समाजकंटक द्वेषाची पेरणी करत होते, ते या कृतीमुळे नक्कीच बदलतील. सलोख्याचे वातावरण राखण्यासाठी सर्वच जण कटीबद्ध आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सलोख्याचा विचार आम्ही एकत्रितपणे पुढे नेत आहोत असे प्रतिपादन कराडहून कोरेगाव-भीमा येथे अभिवादन करण्यासाठी आलेले प्रा. डॉ. ए. जी. ओव्हळ यांनी म्हंटले.