मुंबई-बहुजननामा ऑनलाईन-गेले अनेक दिवस बंद पडलेले मातंग समाजासाच्या विकासासाठी योजना राबवणारे अण्णाभाऊ साठे महामंडळ लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी बहुजन मोर्चा संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यासाठी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मनोज खंडागळे यांच्यासह शिष्ठमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रशांत मयेकर यांच्याकडे निवेदन सादर केले. यासंदर्भात संघटनेला लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेसाठी वेळ दिला जाईल असे सचिव मयेकर यांनी शिष्ठमंडळाला सांगितले.
आघाडी शासनाच्या काळात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले व त्यामुळे महामंडळाचे काम बंद करण्यात आले. वास्तविक महामंडळे ही शासनाची स्वायत्त संस्था असताना अशा रितीने अध्यक्षावरील झालेल्या गैरव्यवहाराचा फटका यानिमीत्ताने मातंग समाजातील तरूणांना बसत आहे. यासाठी योग्यती दक्षता घेऊन शासनाचे आवश्यक नियंत्रण ठेवून सदर महामंडळ कार्यरत राहणे गरजेचे होते परंतु तसे नकरता शासनाने महामंडळाचे कामकाजच बंद केले. ज्याचा फटका मांतग समाजातील तरूणांना बसत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष राजेश खडके यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे महामंडळ लवकरात लवकर सुरू करून त्यामाध्यामातून मांतग समाजाला शासनाच्या विवीध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा. आज मोठ्या प्रमाणात मातंग समाजातील तरूण, होतकरू हे कोणत्याही शासकीय पाठबळा अभावी भरकटू लागले आहेत त्यांना उद्योगधंद्याकडे व विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळ सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी बहुजन मोर्चाच्या वतीने या मागणीचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी समाजाच्या न्याहक्कसाठी संघटनेच्यावतीने आंदोलनाचाही पवित्रा घेतला जाईल असे संघटनेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मनोज खंडागळे यांनी सांगितले.