पनवेल : बहुजननामा ऑनलाईन-ढासळत चाललेली शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी पुण्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुणे ते मंत्रालय मुंबई असा काढलेला लॉंग मार्च आज सकाळी पनवेलला येऊन धडकला थोडासा विसावा घेऊन हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने मार्गस्त झाला आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विषयक उदासीन धोरणाचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी या लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण व्यवस्थेतील उदासीनता डोळ्यासमोर ठेवून आणि राज्यांच्या उज्वल भविष्यासाठी लॉंग मार्चच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्यात आले असून येत्या काळात या लॉंग मार्चला मंत्रालयापर्यंत पोहचू दिले जाणार का? हा पाहण्यासारखा विषय आहे. या अगोदर आदिवासी संचनालयावर काढण्यात आलेला आदीवासी विद्यर्थ्यांचा मार्च पोलिसांनी नाशिकच्या जवळ रोखून धरला होता आणि मार्च मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्या विषयी सरकारवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर आता या मोर्चाला अढवण्याचे दुःसाहन सरकारच्या वतीने केले जाणार नाही असे बोलले जाते आहे.
प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरून घ्याव्या , बंद पडलेली वसतिगृह लवकरात लवकर सुरु करावी ,मराठी शाळा बंद करण्याचे घेतलेले निर्णय मागे घेऊन मराठी शाळांना अनुदान देणे, माध्यमिक तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या भरतीचा निर्णय लवकरात लवकर घेणे या प्रमुख मागण्यासहित हा लॉंग मार्च विद्यार्थ्यांच्या वतीने काढण्यात आला आहे. त्यांच्या मागण्याचा सरकारने गांभीर्यांने विचार करण्याची गरज हे असे बुद्धिजीवी वर्गातून मत व्यक्त केले जाते आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळीत या लॉंग मार्चला विशेष महत्व देण्यात यावे लागणार आहे असे चळवळीशी निगडित कार्यकर्त्यांनी म्हणले आहे.