मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सरकारचे मराठा आरक्षणाबाबत नेमके धोरण काय आहे हे या क्षणाला स्पष्ट होत नाही अशी शंका विरोधी पक्ष नेते धंनजय मुंढे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर मागास आयोगाने दिलेला अहवाल सरकार सभागृहांमध्ये ठेवायला तयार नाही असेही ते म्हंटले.
मागास आयोगाने दिलेला अहवाल सरकार सभागृहांमध्ये ठेवायला तयार नाही मराठा आरक्षणाबाबत चे विधेयक आणायला सरकार तयार नाही त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकारचे नेमके धोरण काय आहे हे या क्षणाला स्पष्ट होत नाहीये. आमचा आग्रह आहे की मागास आयोगाने शिफारशी केल्या आहेत तो अहवाल सभागृहामध्ये सादर करा आणि अस्तित्वात असलेला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. याचबरोबर धनगर आरक्षणाबाबत भाजपा सरकारने टाटा इन्स्टिट्यूटमध्ये धनगर समाज मागास आहे की नाही याचा तपास करायला दिला आहे. मात्र आज एक महिना झाला टाटा इन्स्टिट्यूट चा अहवाल येऊन, परंतु सरकार या अहवालावर चर्चा करायला तयार नाही. असे विरोधी पक्ष नेते धंनजय मुंढे यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर टाटा इन्स्टिट्यूट चा अहवाल ठेवा आम्ही काम करायला तयार आहोत. टीस ने धनगर समाजाच्या बाबतीत काय सांगितले आहे. खरंच धनगर समाज मागासलेला आहे की नाही. हे महाराष्ट्रातील धनगर समाजाला कळणे आवश्यक आहे. असे ते म्हंटले.
विशेष म्हणजे, भाजपा सरकारची भूमिका सत्तेत येण्या आगोदर या धनगर समाजबाबतीत पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याची होती. मात्र आज चार वर्षे झाली धनगर समाजाला खेळवत ठेवण्याचे पाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे सरकार करत आहेत. त्यामुळे टिस चा अहवाल सभाग्रह मध्ये ठेवा मग आम्ही चर्चा करायला तयार आहोत अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी केली.
इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत आघाडीचे सरकार असताना ५ टक्के आरक्षण दिले, त्या आरक्षणाविरोधात लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यावेळी शैक्षणिक आरक्षण ग्राह्य धरले. म्हणजे सरकारने घेतलेला तो निर्णय हायकोर्टाने मान्य केला आणि स्वीकारला. म्हणून आमचा आग्रह होता २०१४ च्या डिसेंबरच्या अधिवेशनापासून की जर मराठा आरक्षणाचे विधेयक २०१४ ला संपत होते, तर मुस्लिम आरक्षणाचेही विधेयक संपत होते. परंतु सरकारने मुस्लिम समाजावर अन्याय करण्याचे पाप केले. त्यामुळे आमचा आग्रह आहे की या महत्त्वाच्या प्रश्नांवर पहिल्यांदा सरकारने घोषणा करावी त्यानंतर विरोधी पक्ष चर्चा करायला तयार आहे. असेही विरोधी पक्ष नेते धंनजय मुंढे यांनी म्हंटले.