२४ नोव्हेंबरपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे सहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय संमलेनात राष्ट्रसंताच्या विचारांचा जागर होणार आहे. २४ नोव्हेंबरला सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान व चिंतनाने या संमेलनाची सुरवात होणार आहे. यानंतर श्री गुरुदेव बालभजन मंडळ बेलखेड यांचे खंजेरी भजन तसेच चंद्रशेखर चतारे व अनिल अडगणे यांच्या संयोजनात सामुदायिक प्रार्थना मंडळाची स्पर्धा पार पडणार आहे. तसेच राष्ट्रसंतांचे आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांचे वाचन व सादरीकरण डॉ. राजीव बोरकर यांच्या संयोजनात पार पडेल. या संमेलनाचा समारोप सायंकाळी ५ वाजता होईल.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. जावेदजी पाशा कुरेशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तसेच लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे हे स्वागत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे भजनसम्राट रामभाऊ गाडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ग्रामगिता जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ प्रचारक गजानन चिंचोळकार व सुनील देशमुख याना देण्यात येणार आहे.
यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. जावेदजी पाशा कुरेशी, स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, विशेष उपस्थिती डॉ. रणजित पाटील, आचार्य वेरुळकर गुुरुजी, डॉ. विघे गुरुजी, किर्तनकार महादेव भुईभार, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधिर सावरकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वर रक्षक, मुगुटराव बेले उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर होणार असलेल्या पत्रकार परिषदेला अनिल गावंडे, बहुजन पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, अॅड. सुधाकर खुमकर, सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, धनंजय मिश्रा, अॅड. संतोष भोरे, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साखरकर, श्रीपाद खेळकर, राजेंद्र झामरे, प्रमोद शेंडे, डॉ. राजीव बोरकर, दिलीप कराळे, शिवा महल्ले, स्वप्निल अहिर, आकाश हरणे, नंदकिशोर डंबाळे, श्रीकृष्ण ठोंबरे, तुषार बरगट आदींसह सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी !
३० एप्रिल १९०९ यावली, जि. अमरावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे असे आहे. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. ११,ऑक्टोबर १९६८ ला मोझरी, जि.अमरावती येथे त्यांचे निधन झाले.