औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – वारसा हक्कानुसार न्यायालयाने जमीन नावावर करण्याचे आदेश दिलेले असताना मंडळ अधिकारी आणि तलाठी हे सातबारा नावावर करत नसल्याने महिलेने चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छा मरणाची मागणी केली.
आशाबाई धोंडू बोराडे असे महिलेचे नाव आहे.
आशाबाई यांची सिल्लोड तालुक्यातील मौजे उडणगाव परिसरातील गट नं ३३६ मध्ये एक हेक्टर ६९ आर जमीन आहे. या जमीनीबाबत सिल्लोड दिवाणी न्यायालयाने दावा डिग्री केलेला आहे. त्याबाबत न्यायालयाने २९ नोव्हेंबर २०१४ मध्ये रितसर आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे सोपस्कार पार पाडत ही जमीन नावावर करून देणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे अर्ज केला. मात्र त्याकडे दोघेही लक्ष देत नाहीत. त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होत आहे.म्हणून आपल्याला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंती महिलेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.