शहरातील रामलीला मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे नियोजन होते. पण पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने धनगर समाजाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ शकले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची सभा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री काही बोलण्यापूर्वीच व्यासपीठासमोर बसलेल्या २५ ते ३० धनगर समाज बांधवांनी अचानकच चालू सभेत उभे राहून पिळवे झेंडे फडकविले. तसेच ‘जय मल्हार’च्या घोषणा करत धनगर आणि धनगड एकच असल्याचे सांगत धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे, भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या.
सभेत गोंधळ होत असल्याने पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित आंदोलकांच्या हातातील पिवळे झेंडे जमा करून घेतले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत हिंगोलीच्या सभेतच मराठा आरक्षण लागू करू, असा शब्द दिला होता, तो आम्ही पूर्ण करून दाखविला. धनगर आरक्षणाचा शब्दही भाजप पूर्ण करेल, तुम्ही आमचेच बांधव आहात, त्यामुळे काळजी करू नका. भाजप सरकार धनगर आरक्षण देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. आता हे आश्वासन तरी भाजप सरकार पूर्ण करणार का, असा सवाल या सभेनंतर धनगर समाजाकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील रामलीला मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे नियोजन होते. पण पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने धनगर समाजाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ शकले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची सभा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री काही बोलण्यापूर्वीच व्यासपीठासमोर बसलेल्या २५ ते ३० धनगर समाज बांधवांनी अचानकच चालू सभेत उभे राहून पिळवे झेंडे फडकविले. तसेच ‘जय मल्हार’च्या घोषणा करत धनगर आणि धनगड एकच असल्याचे सांगत धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे, भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या.
सभेत गोंधळ होत असल्याने पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित आंदोलकांच्या हातातील पिवळे झेंडे जमा करून घेतले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत हिंगोलीच्या सभेतच मराठा आरक्षण लागू करू, असा शब्द दिला होता, तो आम्ही पूर्ण करून दाखविला. धनगर आरक्षणाचा शब्दही भाजप पूर्ण करेल, तुम्ही आमचेच बांधव आहात, त्यामुळे काळजी करू नका. भाजप सरकार धनगर आरक्षण देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. आता हे आश्वासन तरी भाजप सरकार पूर्ण करणार का, असा सवाल या सभेनंतर धनगर समाजाकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील रामलीला मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे नियोजन होते. पण पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने धनगर समाजाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ शकले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची सभा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री काही बोलण्यापूर्वीच व्यासपीठासमोर बसलेल्या २५ ते ३० धनगर समाज बांधवांनी अचानकच चालू सभेत उभे राहून पिळवे झेंडे फडकविले. तसेच ‘जय मल्हार’च्या घोषणा करत धनगर आणि धनगड एकच असल्याचे सांगत धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे, भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या.
सभेत गोंधळ होत असल्याने पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित आंदोलकांच्या हातातील पिवळे झेंडे जमा करून घेतले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत हिंगोलीच्या सभेतच मराठा आरक्षण लागू करू, असा शब्द दिला होता, तो आम्ही पूर्ण करून दाखविला. धनगर आरक्षणाचा शब्दही भाजप पूर्ण करेल, तुम्ही आमचेच बांधव आहात, त्यामुळे काळजी करू नका. भाजप सरकार धनगर आरक्षण देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. आता हे आश्वासन तरी भाजप सरकार पूर्ण करणार का, असा सवाल या सभेनंतर धनगर समाजाकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील रामलीला मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे नियोजन होते. पण पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने धनगर समाजाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ शकले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची सभा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री काही बोलण्यापूर्वीच व्यासपीठासमोर बसलेल्या २५ ते ३० धनगर समाज बांधवांनी अचानकच चालू सभेत उभे राहून पिळवे झेंडे फडकविले. तसेच ‘जय मल्हार’च्या घोषणा करत धनगर आणि धनगड एकच असल्याचे सांगत धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे, भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या.
सभेत गोंधळ होत असल्याने पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित आंदोलकांच्या हातातील पिवळे झेंडे जमा करून घेतले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत हिंगोलीच्या सभेतच मराठा आरक्षण लागू करू, असा शब्द दिला होता, तो आम्ही पूर्ण करून दाखविला. धनगर आरक्षणाचा शब्दही भाजप पूर्ण करेल, तुम्ही आमचेच बांधव आहात, त्यामुळे काळजी करू नका. भाजप सरकार धनगर आरक्षण देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. आता हे आश्वासन तरी भाजप सरकार पूर्ण करणार का, असा सवाल या सभेनंतर धनगर समाजाकडून उपस्थित केला जात आहे.