औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – शाळेत न विचारता बिस्कीटं खाल्ल्याच्या कारणावरून संस्थाचालकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलाला डोकं फुटेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
निरंजन सतीश जाधव असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तर संस्थाचालक रामेश्वर महाराज पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
निरंजन हा निवासी शाळेत राहण्यास होता. त्याने पाच रुपयांचा बिस्कीट पुडा घेऊन त्यातील दोन बिस्कीटं खाल्ली. याचा राग आल्याने संस्थाचालक रामेश्वर महाराज पवार याने निरंजनला डोकं फुटेपर्यंत वायरने बेदम मारहाण केली. ११ जूलै रोजी हा प्रकार घडला. त्यानंतर तीन दिवसांनंतर १४ जूलै रोजी त्याचे पालक भेटायला आले होते. त्यावेळी हा प्रकार उघडकिस आला. त्याला मारहाण केल्यानंतर त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत.