मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – थेट जनतेतुन निवडणुक आलेल्या सरपंचांना आता मंत्री व आमदारांप्रमाणे गोपनीयतेची शपथ घ्यावी लागणार आहे. या संबंधित प्रस्तावास ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्यता दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता, त्यास मान्यता देण्यात आल्याचे मुंडे म्हणाल्या आहेत.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हा प्रस्ताव लागू होणार आहे. मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३३(२) अन्वये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यासी अधिकारी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांना शपथ देतील आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ चा अवलंब करून कार्यवाही सुरू करतील.
सरपंचांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींना देखील याच प्रकार शपथ देण्याच प्रस्ताववर देखील विचार सुरु आहे, हा प्रस्ताव देखील मंजुर झाल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य तसेच पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य यांना देखील गोपीनियतेची शपथ घ्यावी लागणार आहे.
गावाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्या जबाबदारीबाबद आणि बांधिलकीबाबद सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जागरुकता यावी हा या शपथेमागचा उद्देश असल्याचे पंकजा पुंडे यांनी व्यक्त केले.