उत्तर प्रदेश बहुजननामा ऑनलाईन – उन्नावमध्ये एका मदरशातील मुलांना जय श्रीराम म्हटले नाही म्हणून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत अनेक मुलं जखमी झाली असून हल्लेखोर बजरंग दलाचे असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत हल्लेखोरांनी मुलांच्या सायकल देखील तोडल्या असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून फेसबुक प्रोफाइलवरुन आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर या हल्ल्यान जखमी झालेल्या तीन मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यापुर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. या घटनेपुर्वीच जय श्रीराम न बोलल्यामुळे आसामध्ये बारपेटा जिल्ह्यात चार समाजकंट व्यक्तीनी तीन मुस्लीम युवकांना मारहाण केली होती. त्यांच्यावर जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली होती.
दरम्यान झारखंडमध्येही बाईक चोरलेला आरोपी तरबेज या 24 वर्षीय तरुणाला एका खाबांला बांधून मारहाण केली होती या मारहाणीत तरबेज बेशुद्ध झाला होता . आणि त्याला जय श्रीराम आणि जय हणुमान म्हणण्याची सक्ती करण्यात आली होती. तरबेज बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यांन पोलीस कोठडीत त्याचा चार दिवसांनी मृत्यू झाला.