पुणे बहुजननामा ऑनलाईन – माझा मोबाईल क्रमांक राज्यसभेच्या वेबसाईटवर आहे. माझा क्रमांक कोणाकडेही असू शकतो. मी जर दहशतवाद्यांशी मिळालेला आहे. तर मग मला अटक का होत नाही. असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे. एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांनी लिहिलेल्या पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल क्रमांक आढळून आला. त्यावर ते बोलत होते.
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासा आरोपींकडे मिळालेल्या चिठ्ठीत दिग्विजय सिंह यांचा मोबाईल क्रमांक आढळून आला होता. त्यावर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
पुढे ते म्हणाले की, नरेंद्र मोदी एकीकडे दहशतवादाच्या विरोधात लढा देत असल्याचे जगासमोर जाऊन सांगतात. तर दुसरीकडे भाजप दहशतवादी व्यक्तीलाच उमेदवारी देते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. ती व्यक्ती नथुराम गोडसेला देशभक्त म्हणते. तुम्ही म्हणता की, उन्हे दिलसे माफ नही करेंगे. परंतु ५६ इंच छातीत किती मोठं ह्रदय आहे हा देखील प्रश्न आहे. असेही ते म्हणाले.