पुणे बहुजननामा ऑनलाईन – चारा घोटाळा प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना उच्च न्यायालयाने बऱ्याच कालावधीनंतर आज जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तुर्तास तरी त्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु अन्य दोन प्रकऱणांमध्ये शिक्षा झालेली असल्याने त्यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे.
लालू प्रसाद यादव यांनी १३ जूनला झारखंड उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यापुर्वी त्यांना लोकसभा निवडणूकीच्या दरम्यानही झारखंड उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. लालू प्रसाद यादव यांना देवघर कोषागार प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यात लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा निम्म्यापेक्षा जास्त कालावधी कारागृहात काढला आहे. त्यांच्याविरोधात एकूण ६ प्रकरणांत सुनावणी सुरु आहे. मात्र त्यातील चार प्रकरणात शिक्षा झाली असून दोन प्रकरणांत सुनावणी सुरु आहे. परंतु इतर दोन प्रकरणांत शिक्षा झाल्याने त्यांना तुर्तास तरी कारागृहातच राहावे लागेल.
Jharkhand High Court grants bail to RJD leader Lalu Prasad Yadav in the fodder scam case relating to Deoghar treasury. (File pic) pic.twitter.com/wWYloD6bew
— ANI (@ANI) July 12, 2019
कोणत्या कारणामुळे मिळाला जामीन ?
देवघर कोषागार प्रकरणात अर्ध्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा पुर्ण झाल्याच्या आधारावर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर रांची उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या हमीवर त्यांना जामीन मंजूर केला. तसेच त्यांनी आपला पासपोर्ट न्यायालयात जमा करावा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.