मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये राज्याचे राजकीय वारे वंचित बहुजन आघाडीने बिघडविल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोर अडचणी वाढल्या आहेत. त्या अडचणीवर मात करण्यासाठी महाआघाडीचे गठबंदन करण्यात आले आहे. हि आघाडी राज्यातील ५६ पक्ष मिळून झाली आहे. हि लोकसभा निवडणूक ५६ पक्ष विरुद्ध ५६ इंच छातीचा सामना रंगणार आहे. अशी घोषणा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित ‘संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीने’ केली आहे.
या ‘संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी’ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप, रिपाइंमधील कवाडे गवई गटासह अनेक गट सामील आहेत. अशी घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, बविआचे हितेंद्र ठाकूर, शेकापचे जयंत पाटील, रिपाइं नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, युवा स्वाभिमानचे रवि राणा आदी घटकपक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागा लढविणार आहेत. मित्र पक्षानं २ जागा तर पालघरची १ जागा ‘बविआला’ आणि १ जागा राजू शेट्टीच्या स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात येईल. व १ जागा रवी रानाच्या युवा स्वाभिमानाला सोडणार आहे. उर्वरित ६ जागांबाबत पक्षाध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेतील. असेही ते म्हणाले.
अजित पवार पत्रकाराशी बोलताना म्हणाले, आम्ही मित्र पक्षांना १० जागा सोडण्याची तयारी ठेवली होती. तसेच आम्ही ३८ जागावर लढणार होतो. पण मुळात त्यांना आघाडीमध्ये सहभागी व्हायचेच नव्हते. त्यामुळे ते भाजपाची “बी” टीम आहे का ? अशी शंका येते. अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकरचें नाव न घेता पवारांनी केली.