मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे सरकार आले. शिवसेनेने भाजपला पळवून लावत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची सत्ता आणली. तसेच अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. सोबतच मुख्यामंत्र्यांनी मागील सरकारच्या अनेक योजनांना विराम देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनतर आता अगोदरच्या सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्द करणार असल्याचेही सांगितले जात आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी त्यांच्या विभागांतर्गत विविध समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केलेल्या समित्या रद्द करणार असल्याची माहिती दिली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बैठक घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय हे उपस्थित होते. तसेच यावेळी ग्रंथालयाची नव्याने पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगत विभागातील ग्रंथालयात अत्याधुनिक सुविधा असाव्यात. विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालय, विद्यापीठांच्या रिकाम्या जागेवर अतिक्रमण झाले तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून त्या जागेचा वापर करावा. जी महाविद्यालये, वसतिगृह यांना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना संचारणात्मक लेखा परीक्षण करावे. तसेच रिक्त पदांचा अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, अशा सूचना उदय सामंत यांनी केल्या.
विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, हे विद्यापीठाचे कार्य आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यानुसार तासिका, परीक्षा, निकाल यांचे नियोजन करून वेळापत्रक तयार करावे. तसेच वेळेत निकाल जाहीर करावेत, असेही सामंत यांनी सांगितले.