मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना युतीबाबत अनेक चर्चाना उधाण आलं होत. मात्र उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला आता पूर्णविराम दिला असून महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असल्याचं सांगत भाजप – शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब केला आहे.
उद्धव यांच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी जम्मू -काश्मीर संदर्भातील कलम ३७० रद्द केल्याबद्दल मोदींचे कौतुकही केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पंतप्रधानांना राम मंदिराची तसेच समान नागरी कायद्याची आठवणही करून दिली आहे.
आज मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले आहे. मेट्रोच्या विस्तारासाठी तीन मार्गांचा भूमिपूजन आज करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान यांनी विकासकामांचा आढावा घेतला . या कार्यक्रमाला मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री पियुष गोयल , रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणले कि, ‘कलम ३७० हटविल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे, मोदीजिचा मला अभिमान वाटतो. तसेच तुम्ही अयोध्येत रॅम मंदिर देखील बांधाल असा विश्वास आहे.’
तसेच उद्धव पुढे म्हणले कि, ‘सरकार हे युतीचंच येणार आहे, जे करायचं ते खुलेपणाने करायचं आहे. आम्हाला सत्ता हवी , परंतु आम्हाला सत्तेची हाव नाही. परंतु राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे. ‘ असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांनी जोराने टाळ्या वाजवत युतीबाबत निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनीदेखील उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला आहे. त्याला शिवसेना प्रमुखांनी हसून दाद दिली.
दरम्यान , पंतप्रधानांनी गणेशोस्तवाच्या वेळी जलप्रदूषण न करण्याचे आवाहनही केले आहे. ते म्हणले आपल्याला संकल्प करायचंय कि, विसर्जनानंतर आपल्याला समुद्रातील घाण साफ करायची आहे. तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतकही त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले , आव्हानांचा सामना करत पुढे जाणारे लोकच मोठे होतात. मिशन चांद्रयान मध्ये अडथळा आला आहे. मात्र आपले बहादूर वैमानिक मागे हटणार नाहीत , चंद्रावर पाऊल टाकण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणारच ,असा विश्वास त्यांनी मांडला .
यावेळी त्यांनी विकासकांच्या आढाव घेत सांगितले कि, ‘गणेश आगमनबरोबर अनेक विकास कामांचा देखील श्रीगणेशा होत आहे. मेट्रोमुळे कमी वेळात मुंबईत प्रवास होईल, फडणवीस सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले आहे. तसेच आगामी काळात आधुनिक सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशभरात ट्रान्सपोर्टला मजबूत करण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. जे आधी कधीच नाही झाले .’
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत