सातारा : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत जनतेने जनमताचा कौल सलग तिसऱ्यांदा खासदार उदयनराजेंच्या बाजूने दिलाय परंतु यानंतर साताऱ्यातील राजकीय कलह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजें यांच्यावर आरोप करत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर खासदार उदयनराजें यांचे वागणं बदललं असल्याचे म्हंटले आहे. तसेच मतदार संघात कुरघोड्या करत असल्याचा आरोपही शिवेंद्रराजें यांनी केला आहे.
रामराजे आणि आमचे बंधू उदयनराजे यांच्यातील वाद विषय त्यांचा त्यांनी बघावा. त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही. असेही शिवेंद्रराजे म्हणाले. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात कुरघोड्या सुरु आहेत. याबाबत मी पक्षश्रेष्ठींना सांगितले जाते. वेळेच लक्ष घाला, माझे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. रामराजेंसोबत माझ कसलंही सेटिंग नाही, माझ सेटिंग साताऱ्यातील मतदारांशी, जनतेशी सेटिंग आहे, असेही ते म्हणाले.
आम्ही लोकसभेला उदयनराजेंचे काम प्रामाणिकपणे केले आहे ते सातारा जावळीतील मतदारांनी बघितले आहे. आणि आता ते कसे वागत आहेत याच मूल्यमापन लोकांनीच करावे. गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीने त्यांनी काम करू नये. उदयनराजेंचं निवडणुकीनंतर वागणं बदललं आहे. त्यांच्या कुरघोड्या ह्या आम्हाला काही नवीन नाहीत, असेही शिवेंद्रराजे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटत असतो असं सांगून पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचा दावा देखील आमदार शिवेंद्रराजेंनी केला आहे.