नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नवीन अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे अभिनंदन करताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांना जनतेने नाकारले आणि आता तेच खोट बोलत आहेत. निवडणुकीत जनतेने ज्यांना नाकारले, त्यांच्याकडे आता खूप कमी शास्त्रे उरली आहेत, असे मोदी म्हणाले. भाजपच्या अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची निवड झाल्यावर दिल्लीच्या पक्ष कार्यालयात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आपले. त्यावेळी नरेंद्र मोदी, माजी अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच अनके दिग्गज नेते उपस्थित होते. त्यावेळी भाषण करताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
लोकांपर्यंत जाण्याची आवशक्यता असून सक्रिय राहण्याची गरज आहे. नाकारलेले लोक अफवा पसरवतात. त्यांच्यावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ते खोटं बोलत राहतील आणि आम्ही पुढे जात राहू,असे मोदी म्हणाले. हिमाचलच्या लोकांना वाटत की हिमाचलचा सुपुत्र भाजप अध्यक्ष झाला आहे. पण नद्दांवर जेवढा अधिकार हिमाचलचा आहे, तितकाच अधिकार बिहारचाही आहे. त्यांचे शिक्षण बिहारमध्ये झाले असून बिहारला त्यांचा जास्त अभिमान वाटला असेल. माझ्या आयुष्यातील सर्वात ऊर्जा देणारे दिवस हिमाचलमधील होते, असेही मोदी म्हणाले.
मला खूप काळ हिमाचलमध्ये काम करता आले. मी जेव्हा पक्षाचे काम करत होतो, तेव्हा नड्डा हे युवा मोर्चाचे काम करत होते. ज्या आशा आणि अपेक्षांसह पक्ष स्थापन झाला आहे, त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. सत्तेत असताना संघर्ष करणे एखाद्या राजकीय पक्षासाठी खूप कठीण असत. पण भाजप सत्तेत असताना अमित शहा यांनी पक्ष वाढवला. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी खूपच भाग्यवान आहे. इथे बसलेल्या सर्व नेत्यांसोबत काम करायला मिळाले. त्यांचे बोट पकडून शिकायला मिळाले, असे मोदींनी सांगितले.