नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – देशभरातील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपच्या उमेदवार प्रज्ञा साध्वी यांनी पराभव केला आहे. यानंतर दिग्विजय सिंह यांनी या निकालावर नाराजी व्यक्त करत ‘हा महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचा विजय झाला.’ अशी प्रतिक्रिया पराभवानंतर दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला भाजपा उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देशभक्त म्हंटले होते. यानंतर ही अनेक विवादित व्यक्तव्यांमुळे प्रज्ञा सिंह ठाकूर चर्चेत राहिलेल्या होत्या. अशातच भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपच्या उमेदवार प्रज्ञा साध्वी यांनी पराभव केला यावर दिग्विजय सिंह यांनी पराभवनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली की, ‘आज देशात गांधींच्या विचारसरणीचा पराभव झाला आहे तर गांधींच्या मारेकऱ्यांचा विजय झाला आहे’. असंही त्यांनी म्हटलंय.
कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली
साध्वी प्रज्ञा सिंह ( भाजपा ) ८६६४८२ -विजयी उमेदवार
दिग्विजय सिंह (काँग्रेस ) ५०१६६०
Senior Congress leader Digvijaya Singh who lost to BJP's Pragya Singh Thakur from Bhopal LS constituency: Today in this country, the ideology of the killer of Mahatma Gandhi won and the ideology of Gandhi lost. This is a cause of concern for me. pic.twitter.com/MSV5rDtX1m
— ANI (@ANI) May 24, 2019