नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – देशात प्रस्थापित पक्षांना चॅलेंज करत लोकसभा निवडणुकांआधी वंचित बहुजन आघाडी देशात तिसरा पर्याय म्हणून समोर आली.तर यंदाच्या लोकसभेत राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु,जवळपास ४१ लाख मते आपल्या पारड्यात घेऊन वंचित बहुजन आघडीने तिसरा पर्याय म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.येत्या विधानसभेत महाआघाडीने वंचितकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभेच्या जवळपास ७० जागांवर पाणी सोडावे लागेल.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम नेता अससुद्दीन ओवैसी यांनी मिळून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. संपूर्ण राज्यभरातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय ठरली. राज्यात यंदाच्या लोकसभेत औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहे . परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही आपल्या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला.
राज्यभरातून वंचित बहुजन आघाडीच्या ९ उमेदवारांनी जवळपास १ लाखांपेक्षा अधिक मते मिळवली आणि याचा सर्वात जास्त फटका काँग्रेस आघाडीला बसला आहे त्यांच्या जवळपास ९ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला यानुसार वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपला दबदबा निर्माण केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकांमध्ये तिसरा पर्याय ठरण्यास सक्षम झाली आहे. यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाआघाडीने वंचितकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभेच्या ७० जागांवर पाणी सोडावे लागेल.