तिरुवनंतपूरम : बहुजननामा ऑनलाईन – २०१४ ची पुनरावृत्ती करत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवत मोदी सरकार सत्तेत आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक राज्य काँग्रेस मुक्त केली. पण देशात असे एकमेव राज्य आहे जेथे भाजपचा भगवा झेंडा फडकला नाही.
तर ज्या काँग्रेसला संपूर्ण देशाने नाकारले त्यांना या राज्यांना मोठा विजय मिळून दिला. लोकसभेच्या २० जागा असलेल्या केरळमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर भाजपला यंदा देखील एकही जागा जिंकता आली नाही. यंदाच्या निवडणुकीत भाजपने केरळमध्ये विजयासाठी मोठा जोर लावला होता. पण त्यांना एकही जागा मिळाली नाही .परंतु काँग्रेसला या राज्यात १५ जागा मिळाल्या आहेत. डाव्या आघाडीला केवळ एकच जागा मिळाली.
भाजपने तिरुवनंतपूरम, त्रिशूर आणि पटन्मथिट्टा या ३ मतदारसंघात विजयासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. विशेषत: तिरुवनंतपूरमध्ये शशी थरुर यांच्याविरुद्ध भाजपला विजयाची अपेक्षा होती. गेल्या निवडणुकीत थरुर यांचा केवळ १५ हजार मतांनी विजय झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांना विजयाची आशा होती. पण थरुर यांनी मोदी त्सुनामीत ९९ हजार मतांनी विजय मिळवला.