औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – भाजप- शिवसेना सरकारने मराठा आरक्षणावर जर एका महिन्यात ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल असे मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मला औरंगाबाद लोकसभेत २ लक्ष ८३ हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत.जर मराठा आरक्षण कायदा झाला नाहीतर मराठा समाज वंचित आघाडीसोबत दिसेल, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची देखील बरीच चर्चा झाली. गेली २० वर्षे औरंगाबादचं खासदारपद भुषवणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करत वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिलेले एमआयएमचे इम्तियाज जलील ३ लाख ८८ हजार ९५७ मतं घेत औरंगाबादचे खासदार म्हणून विजयी झाले.