बहुजननामा ऑनलाइन – २०१६ साली निश्चलनीकरण अर्थात (fake currency)नोटबंदीचानिर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. त्याला आता चार वर्षे पूर्ण झाली. काळ्या पैशाला (fake currency)आळा घालणे, अतिरेकी कारवाया थांबवणे, खोट्या नोटा हद्दपार करणे या उद्दिष्टांसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. मात्र, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार (एनसीआरबी), (fake currency )मागील वर्षी पकडण्यात आलेल्या बनावट नोटांपैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रुपयांच्या असल्याचं उघडकीस आलं आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या डाटामध्ये म्हटलं आहे की, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये बनावट नोटा पडकल्या जाण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. तसेच २०१९ मध्ये देशात २५.३९ कोटी रुपयांच्या बनवत नोटा पकडण्यात आल्या होत्या. तर २०१८ मध्ये १७.९५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा पडकण्यात आल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं. सरकारी आकडेवारीनुसार २०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या ९० हजार ५६६ बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्यातील बहुतेक नोटा कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल मधून जप्त करण्यात आल्या.
तथापि, नोव्हेंबर २०१६ पंतप्रधान मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना या निर्णयामागे ४ उद्दिष्टे असल्याचे जाहीर केले होते. खोट्या नोटांवर परिणामकारक कारवाई करणे, भ्रष्टाचार रोखणे, दहशतवादी कारवायांना होणाऱ्या पैशाची रसद बंद करणे आणि काळ्या पैशांवर परिणामकारक कारवाई करणे. मात्र, आता चार वर्षानंतर सुद्धा पुन्हा बनावट नोटा चलनात आल्याचे दिसून येत आहे.
त्याबरोबर २०१९-२० च्या आर्थिक वर्षात २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई केली नसल्याचं, रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात सांगितलं आहे. देशात सुद्धा २ हजार रुपयांच्या नोटांचं प्रमाण आता कमी झालं आहे, असे असताना मोठ्या प्रमाणात नोटा जप्त करण्यात येत आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार, मागील वर्षात १०० रुपयांच्या ७१ हजार ८१७ बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्यातील सर्वाधिक ३१ हजार ६७१ नोटा दिल्लीतून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर १६ हजार १५९ गुजरात आणि ६ हजार १२९ नोटा उत्तर प्रदेशमधून जप्त केल्या होत्या.