मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग झालेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचा पहिला बळी मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात झाला आहे. उपचारादम्यारन 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपुर्वी ते दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते. कोरोनाचा हा देशातील तिसरा बळी ठरला असून याआधी कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये आणि दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्रास होऊ लागल्याने या रुग्णाला 8 मार्चला रुग्णालयात रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही दिवस उपचार घेऊन ते घरी परतले होते. त्यांना पुन्हा कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Maharashtra: A 64-year-old COVID-19 patient passes away at Mumbai's Kasturba hospital pic.twitter.com/E1X8Dj78n0
— ANI (@ANI) March 17, 2020
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1हजार 63 होम क्वारंटाईन असून त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
पिंपरी चिंचवड मनपा- 9
पुणे मनपा- 7
मुंबई -6
नागपूर-4
यवतमाळ-3
नवी मुंबई-3
कल्याण – 3
रायगड-1
ठाणे-1
अहमदनगर-1
औरंगाबाद- 1
एकूण – 39