कोलकाता : बहुजननामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशमध्ये सपा -बसपाची आघाडी केल्यामुळे राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी आम्हाला काँग्रेस ची गरज नाही असे अखिलेश यादव यांनी स्पष्टीकरण दिले.
काँग्रेस पक्षाचा मला आदर आहे व माझे काँग्रेसची उत्तम संबंध आहेत. पुढचा पंतप्रधान उत्तर प्रदेशातला असला तर ती निश्चितच आनंदाची गोष्ट असेल. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सहकार्य घेऊ कि नाही ते आम्ही योग्य वेळी ठरवू . सध्याच्या सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून त्यांची निवडणुकीनंतर इच्छा पूर्ण होईल. असे यादव म्हणाले.
काँग्रेसने ८० जागा स्वबळावर लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे नुकसान होणार नाही का असे विचारता अखिलेश म्हणाले की, आमची सत्ताधाऱ्यांविरोधात एकजूट अधिक मजबूत झाली आहे. परस्परांशी असलेले उत्तम संबंध हा वेगळा मुद्दा आहे. भाजपाला हरविणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिवपाल करणार काँग्रेसबरोबर बोलणी
समाजवादी पक्षातून बाहेर पडलेले व प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया)चे अध्यक्ष शिवपाल यादव म्हणाले की, आम्ही राज्यात काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांशी जागावाटपाची चर्चा करणार आहोत. ते अखिलेश यादव यांचे काका आहेत. प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया) पक्षाला किल्ली हे निवडणूक चिन्ह मिळाले.
जर काँग्रेस, प्रगतिशील समाजवादी पार्टी, (लोहिया ) इतर धर्मनिर्पेक्ष गट एकत्र आले तर उत्तर प्रदेशच्याच राजकारणाचे समीकरण न पाहता देशाच्या राजकारनाचे समीकरण काय असेल हे लोकसभा निवडणुकीनंतर पाहता येईल.