अलवर : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे. आगामी निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल. व काँग्रेसला अवघ्या ९० जागा मिळतील बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये फक्त दुपटीने वाढ होत ८८ ते ९० पर्यंतच मजल मारता येईल, असेही त्यांनी सांगितले.
अलवर येथील रामगड विधानसभा मतदारसंघासपाच्या तिकिटावर नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर नटवर सिंह बोलत होते. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच मायावती यांची पंतप्रधान होण्याची जास्त शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. महाआघाडीवरून ते म्हणाले की, पंतप्रधान अजून पर्यंत दक्षिण भारत समजू शकलेले नाहीत. कारण त्यांना कोणताच दृष्टीकोन नाही. जो काँग्रेसचा संपूर्ण भारतासाठी दृष्टीकोन होता. तो मोदींकडे नाही. महाआघाडीबाबत बोलताना नटवर सिंह म्हणाले की, ज्यापद्धतीने आघाडीची स्थापना झाली आहे. त्यावरून महाआघाडीचा विजय निश्चित आहे. भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरेल पण बहुमतापासून ते दूर राहतील.