अकाेला : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेस पक्षाने २०२४ च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे, २०१९ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना संधी द्यावी असा सल्ला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. याचबरोबर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीने सहभागी व्हायचे की नाही, याबाबतची भूमिका आपण २३ जानेवारी राेजी जाहीर करू असेही ते म्हंटले.
अकोला येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपला पराभूत करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्यास त्यांच्याकडे दिलदारपणा असायला हवा. काेलकाता येथे शनिवारी झालेल्या २२ राजकीय पक्षांच्या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण हाेते की नाही, याबाबत शंकाच आहे. या सर्व पक्षांचे काँग्रेससोबत मतभेद आहेत. असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले. याचबरोबर धनगर समाज आता तडजोड करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. आपला वापर हाेताे हे लक्षात आल्यानंतर आमच्या सभांना धनगर समाजबांधव स्वत:चा पैसा खर्च करून गर्दी करीत असून, आपल्या हक्कांसाठी ते संघर्ष करीत आहेत असेही ते म्हंटले.
इतकेच नव्हे तर, ब्राह्मण समाजासह सवर्णातील किती घटकांकडे १ हजार चाैरस फुटांचे घर आहे? त्यामुळेच या आरक्षणाचा फायदा हा इतर समाजातील सवर्ण असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या घटकांनाच हाेईल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सवर्ण आरक्षणाचा फायदा हाेणार नाही. हिंदूंच्या सरकारमध्ये शिक्षण क्षेत्रात ओबीसींना मात्र फायदा हाेत नसून, याबाबतची राज्यातील प्रमुख संस्थांमधील आकडेवारी लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले. तसेच मायावती यांच्या बसपा आणि समाजवादी पार्टीने डावलल्यामुळे काँग्रेसने नाइलाज म्हणून उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागांवर उमेदवार उभे करण्याची घाेषणा केली खरी; पण त्यांनी ती अमलात आणली तर त्याचा फायदा बसपा-सपाला हाेइल, असेही ते म्हंटले. युती केल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने असलेली कट्टर हिंदूंची मते आम्हाला मिळत नाहीत. केवळ मुस्लिम मतेच मिळतात, असा आमचा अनुभव असून, हेच महाराष्ट्रातही हाेते, असेही ते म्हंटले.