पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुरोहितांना पाच हजार आणि शेतकऱ्यांना पाचशे ? बेरोजगारी आणि नोकऱ्यांच्या उपलब्धतेसंदर्भात काहीच माहिती उहापोह नाही. हा अर्थसंकल्प नव्हे तर प्रधानमंत्री बचाओ योजना अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून अर्थसंकल्पावर घणाघात केला आहे.
केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प काल संसदेत सादर करण्यात आला. केंद्राने दोन हेक्टर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये ६ हजार रुपये प्रतिवर्ष देण्याची घोषणा केली. ही रक्कम दरमहा पाचशे रुपये अशी होते. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये पुरोहितांना दरमहा पाच हजार आणि शेतकऱ्यांना पाचशे रुपये देण्याबाबत सवाल उपस्थित केला आहे. तर बेरोजगारी आणि आणि नोकऱ्यांसदर्भात कोणताही उहापोह नाही. तर कर मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्यात कोणाचा फायदा नाही. हा अर्थसंकल्प नव्हे तर प्रधानमंत्री बचाओ योजना आहे. असे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.