बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा सरकारने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावर काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे .भाजपाचा जाहीरनामा म्हणजे एका व्यक्तीचा आवाज असून ,जो व्यक्ती खूप गर्विष्ठ आहे जाहीरनामा एका बंद खोलीत तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका त्यांनी केली आहे.
‘काँग्रेसचा जाहीरनामा मोठ्या चर्चेनंतर तयार करण्यात आला आहे. यामध्ये १० लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या मतांचा यामध्ये समावेश केला आहे. हा अत्यंत प्रभावशाली दस्तऐवज आहे,’ असे ट्विट त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये भाजपाने राष्ट्रीय सुरक्षेवर भर देत दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ बाबत प्रतिबद्ध असल्याचा पुनरूच्चार केला. त्याचबरोबर ६० वर्षांनंतर शेतकरी आणि छोट्या दुकानदारांना निवृत्तीवेतन देण्यासह अनेक आश्वासने दिली आहेत. त्या आश्वासनाचे काय होणार हे निवडणुकीनंतर कोणते सरकार सत्तेवर येईल त्यावरच कळेल .